आजपासून बोथी तांडा मार्गे उदगीर लालपरी बस सेवा सुरु….!
बोथीचे माजी सरपंच गंगाधरअप्पा अक्कानवरु यांच्या पाठपुराव्याला यश.
संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995
आजपासून बोथी तांडा मार्गे उदगीर बस धावणार…!
आ.बाबासाहेब पाटील आणि माजी सरपंच गंगाधरअप्पा अक्कानवरु यांच्या पाठपुराव्याला यश……
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले आहे तरीही अजून काही खेडोपाडी तांडा वस्तीवर कुठल्याही प्रकारची वाहतुकीची सुविधा नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे.यातच लातुर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जवळपास १८०० लोकसंख्या असलेला बोथी तांडा हे पण गाव आहे.भारताचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर उपक्रम राबविला परंतू आजही काही खेडी आझाद झाली नाहीत असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.आजपासून चाकूर ते उदगीर ही बस सेवा बोथी,बोथी तांडा,रोहिणा,हेर,करडखेल मार्गे उदगीर सुरु करण्यात आली आहे.याचे सर्व श्रेय चाकूर-अहमदपूर विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष बोथी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गंगाधरअप्पा अक्कानवरु यांना जातो.त्यांच्याच सततच्या पाठपुराव्याने ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
बोथी तांड्यातील विद्यार्थी हे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत घेतात परंतू माध्यमिक शिक्षणासाठी या तांड्यातील विद्यार्थ्यांना दोन किलोमीटरचा अंतर ऊन,वारा,पावसात बोथी गावापर्यंत पायपीट करावे लागत होते आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी व वयोवृद्धानांही बोथी पर्यंत चालत जाऊन तेथून चाकूरला खाजगी वाहनाने जावे लागत होते त्याला आता स्थगिती मिळणार आहे,कारण आजपासून लालपरी बोथी तांडा मार्गे धावणार असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे.फोनवरुन पत्रकार सुनिल जाधव यांनी अहमदपूर आगार प्रमुख अमर पाटील यांनी बस सेवा सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले त्यांच्याशी संवाद साधला असता पाटील म्हणाले की,तुम्ही कर्मचार्यांना सहकार्य करा आम्ही सेवा देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.बोथी तांड्यात बसचे आगमन होताच लालपरीला हार घालून त्यामधील चालक लिंबराज घोगरे व वाहक प्रकाश तोटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने बोथी ग्रामपंचायत माजी सदस्य नवनाथ आवाळे यांनी यथोचित पुष्पहार घालून सत्कार केला.लातुर जिल्हा आगार प्रमुख मिरजकर व अहमदपूर आगार प्रमुख अमर पाटील यांचे फोनद्वारे माजी सरपंच गंगाधरअप्पा अक्कानवरु यांनी अभिनंदन केले.
यावेळी लिंबराज जाधव,अशोक राठोड,रामु पवार,विलास चव्हाण,अंकूश राठोड,राजू जाधव,माधव भिंगेवाड,देवराव महात्मे,गुंडेराव महात्मे,हणमंत आवाळे,हणमंत धायगुडे,बालाजी केंद्रे,सचिन केंद्रे,भरत देगणुरे,भरत इटकरे,राहूल श्रीरामे,सुभाष आलट,लक्ष्मण जाधव,पंढरी तिकटे,गणेश चव्हाण,व महिला उज्वला जाधव,सुलाबाई राठोड,सुशिला जाधव व बोथी आणि बोथी तांड्यातील यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.