सततच्या नापिकीला कंटाळून कै.बाळू सोपान मेखले यांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा…..!
चाकूर तालुक्यातील देवंग्रावाडी येथील ४२ वर्षीय शेतकरी बाळू सोपान मेखले यांनी सततच्या नापिकीमुळे कंटाळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.ही घटना १ आक्टोबर ठीक सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बाळू मेखले यांच्या सतत चार वर्षापासून शेतातील नापिकीमुळे कुठलाही भरघोस असा उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर असलेला लातुर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा.नळेगाव व खासगी सावकाराचे कर्ज घेऊन आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह भागवीत होते. पण यावर्षीही सोयाबीन या पिकावर रोगराई पडल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार व शेतीमध्ये आपल्याला पाहिजे तसा उत्पन्न मिळणार नाही व बँकेचे आणि सावकाराचे कर्ज यावर्षीही आपण फेडू शकणार नाही म्हणून बाळू सोपान मेखले यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. यासंदर्भात पोलीस चाकूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कै.बाळू सोपान मेखले यांच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ,दोन मुली हे पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आहेत व एक मुलगा असा परिवार आहे.