आपला जिल्हा

बीआरएस पक्षप्रवेश जोमात,कार्यकर्ते मात्र विचाराच्या कोमात….!

मुख्य संपादक सुनिल जाधव 9766553995

बी आर एस पक्षप्रवेश जोमात,कार्यकर्ते,मात्र विचाराच्या कोमात……!

प्रवेश केलेल्या बहूसंख्य कार्यकर्त्याच्या बत्या झाल्या गुल..! 

तेलंगणा राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीचा कालच्या रविवारी लागलेल्या निकालात बी आर एस पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे आता मराठवाड्यातील लातुर जिल्ह्यातील चाकूर-अहमदपूर विधानसभेतील बहूसंख्य कार्यकर्त्यांनी बी आर एस नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत अनेकांनी जोरदार पक्षप्रवेश केला होता,परंतू तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती या पक्षाने पराभव पत्कारल्याने आता सद्या पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची इकडे आड,तिकडे विहीर” अशी अवस्था झाल्याचे चित्र सद्यस्थितीत तर दिसून येत आहे.

तेलंगणा राज्यातील बी आर एस पक्षाने शेतकर्यासाठी खूप काही योजना राबविल्या आहेत तर महाराष्ट्रात या योजना का होत नाहीत आणि अबकी बार किसान सरकार असे म्हणत गावोगावी पक्षप्रवेश जोमाने सुरु असताना मध्येच तेलंगणा राज्यात बी आर एस पक्षाला धूळ चारत कॉंग्रेस सरकारने तेलंगणा राज्यामध्ये बाजी मारली आता आपले हाल कसे होतील हा विचार करण्यात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या विचाराने बत्या गुल झाल्या आहेत.

आता येणार्या विधानसभा निवडणुकीत बी आर एस पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि आम्ही शेतकरी या वर्गासाठी जास्तीत जास्त कामे करणार आहोत. वेगवेगळ्या योजना आमच्या पक्षाकडून महाराष्ट्रात राबविल्या जातील असे सांगितले जात आहे.तर येणार्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्या पक्षाचे पारडे मतदानरुपी आशिर्वाद देऊन जड ठेवतील याकडे चाकूर-अहमदपूर विधानसभेतील जनतेला याची चाहूल लागली आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.