चाकूरात “मेरी माटी मेरा देश”या अमृत कलशाचे जंगी स्वागत
अमृत कलशाचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन..!
मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो:-9766553995
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड.युवराज पाटील चाकूरकर यांच्याहस्ते स्वागत……
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज चाकूर शहरात अमृत कलश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा भैरवीताई वाघ,प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक,धनराज गुट्टे,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दत्ता चेवले,प्रदेश सदस्या ललिताताई जाधव भाजपा युवा मोर्चाचे लातुर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांनी यावेळी उपस्थित होते.
चाकूर तालुक्यातील विविध गावातील मुठभर माती या अमृत कलशात जमा करण्यात आली,या अमृत कलश यात्रेचे चाकूर शहरातील स्वामी विवेकानंद चौकामध्ये ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले.त्यावेळी अमृत कलशास नमन करुन वीरांना मानवंदना देण्यात आली.उपस्थितांना पंचप्राण प्रतिज्ञा देण्यात आली.
संपूर्ण भारतभर “मेरी माटी मेरा देश” या अभियानास १५ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आले असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महामंत्री विक्रांत पाटील,युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाने मराठवाडा विभागात आई तुळजाभवानीच्या दर्शनाने मराठवाडा दौर्याची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.
चाकूर शहरातून अमृत कलश यात्रा काढून कमिटीकडे कलश सोपविण्यात आले आणि याच कलशातील माटीने दिल्ली येथील शुरविरांच्या स्मरणार्थ अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.यावेळी नगरसेवक नितीन रेड्डी,साई हिप्पाळे,शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे,माजी नगरसेवक संतोष माने,रमेश पाटील,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गजानन करेवाड,आनंद बेजगमवार,विश्वनाथ काटवटे,अमित पाटील,दिपक जनवाडे,ऋषी केदासे,इत्यादीसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.